करमाळा सोलापूर जिल्हा

उजनी जलाशयातील जलवाहतूक ठप्प; विद्यार्थी, नागरिकांचे हाल; नियम व अटी घालून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी जलाशयातील जलवाहतूक ठप्प; विद्यार्थी, नागरिकांचे हाल; नियम व अटी घालून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी

केत्तूर (अभय माने) २१ मे रोजी घडलेल्या बोट दुर्घटने पासून उजनी जलाशयातील कुगाव ते शिरसोडी ,कुगाव ते कालठण , चिखलठाण ते पडस्थळ ,ढोकरी ते गंगावळण , पोमलवाडी ते चांडगाव आदी मार्गावरील जलवाहतूक बंद आहे .

सध्या नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असून करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील शेकडो विदयार्थी – विद्यार्थिनीं शिक्षणासाठी इंदापूर तालुक्यात दररोज ये -जा करणारे आहेत .

या परिसरातील नागरिक वैद्यकिय उपचारासाठी इंदापूर , अकलुज व बारामती येथे जातात . टेंभूर्णी मार्गे अथवा राशीन भिगवण मार्गे जवळपास 90 /100 किमी अंतर जावे लागते म्हणून या जलाशयात मंजूर पूल पूर्णत्वास येईपर्यंत ही जलवाहतूक चालु असणे आवश्यक आहे .

बोट चालकांना नियम वअटी – शर्ती घालुन व प्रवाशांच्या सुरक्षीततेची साधने सक्तीची करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींच्या मजबूतीबाबत व सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी करावी .

हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

कारण ही वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे जर ही जलवाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली तर सर्वांना दिलासा मिळेल . असे मत भाजपा जिल्हा यूवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे .

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!