*पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा केत्तूर येथील नेताजी प्रशालेत निषेध*
केत्तूर ( अभय माने) काश्मीरमधील पर्यटन स्थळ पहलगाम परिसरात बैसरण व्हॅली येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल, इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी मनीष रंजन यांच्यासह 27 पर्यटकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले. या भ्याड हल्ल्याचा केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयात विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.व मृतात्म्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शांतपणे उभे राहून मृतांना मानवंदना देण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम ..अशा घोषणा दिल्या.
आधुनिक काळात कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज-कौस्तुभ गावडे
अतिरेकींनी केलेल्या या भ्याड हल्ल्याला जशास तसे सडेतोड उत्तर भारत सरकारने द्यावे, पाकिस्तानवर थेट हल्ला करून काश्मीर हल्ल्याचा बदला घ्यावा व पाकिस्तानला जन्माची आद्दल घडवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी अतिरेक्यांनी भारताच्या ” सौंदर्याला ” डाग देण्याचे काम केले आहे हे काम समूळ नष्ट केले पाहिजे असे स्पष्ट केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.