करमाळासोलापूर जिल्हा

रिटेवाडी व केतुर या दोन्ही उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा; जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रिटेवाडी व केतुर या दोन्ही उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा; जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल

केतूर ( अभय माने) रिटेवाडी उपसा सिंचन योजना व केतुर उपसा सिंचन योजना या दोन योजनेमार्फत करमाळा तालुक्यातील 24262 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते असा अहवाल सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांनी दिला असून मुळे हे प्रकल्प मार्गी लागण्याची तांत्रिक अडचण दूर झाली असून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपर्क मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक लावून ठोस निर्णय घेण्याची भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त गेली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती
या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करा अशी आदेश कुकडी प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना दिले होते
प्रकल्प अधिकारी श्वेता पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे.


उजनी धरणात कुकडी प्रकल्पातून वाहून येणारे चार टीएमसी पाणी करमाळा तालुक्याला देण्यास शक्य आहे असा अहवाल दिला आहे
याशिवाय मौजे रिटेवाडी ते मोरवड हे अंतर 6 किलोमीटर असून एक हजार मिलिमीटर च्या दोन पाईपलाईन मधून दोन हजार एचपीचे सहा विद्युत पंप बसवून रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करण्यास हरकत नाही असाही अहवाल दिला आहे

शिवाय केतुर ते सावडी हे अंतर 17 किलोमीटर असून केतुर येथील पाणी उचलून ते 1500 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईन मधून एक हजार एचपी क्षमतेचे चार विद्युत पंप बसून ही योजना सुरू करण्यास हरकत नाही
दोन्ही योजनेतून करमाळा तालुक्यातील जवळपास 50 गावातील 25000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते असा अहवाल ही कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून हा प्रकल्प अहवाल गुगलच्या माध्यमातून केला असून प्रत्येक ठिकाणचे पाणीसाठा व कॅनलची उंची याची मोजमाप करण्यात आले आहे.

पण हा सर्व प्रश्न धोरणात्मक असल्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा असा अहवाल जलसंपदा विभाग पत्र क्रमांक 1 866 दिनांक 26 एप्रिल 2023 प्रमाणे दिला आहे
मुळे करमाळा तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीची UPSC मध्ये बाजी; देशात 530 वा क्रमांक पटकावला

पोलिस भरतीमध्ये करमाळा तालुक्यातील योद्धा करिअर ॲकॅडमीचा झेंडा; तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी

” याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे आता रिटेवाडी उपसा सिंचन योजना सह केतुर उपसा सिंचन योजनेला सुद्धा गती मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पासंदर्भात तात्काळ मंत्रालयात बैठक घेऊन करमाळा तालुक्याला न्याय देतील असा विश्वास मला वाटतो
– महेश चिवटे

” प्रगतशील शेतकरी मांगी
ही योजना पूर्ण झाली तर मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी राहील जवळपास 20 ते 25 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल शिवाय मांगी प्रकल्पालगत असलेल्या करमाळा एमआयडीसीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठे मोठे उद्योग घेऊन रोजगाराच्या संधी वाढतील यामुळे या दोन्ही योजना ला मंत्रिमंडळाने तांत्रिक मंजुरी तात्काळ खऱ्या अर्थाने करमाळा तालुका सुजलाम सुफलाम होईल.
– सुजित बागल

litsbros

Comment here