करमाळा

उजनी लाभ क्षेत्रात गहू पेरणीची लगबग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी लाभ क्षेत्रात गहू पेरणीची लगबग

केत्तूर (अभय माने): गतवर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणाचा पाणीसाठा 60 टक्क्यावरच स्थिरवला गेला आता त्यामध्ये घट होऊन तो 32 टक्के च्या आसपास आला आहे ऊस पिकाला आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाला फाटा देऊन गहू पिकाला पसंती दिल्याचे उजनी लाभक्षेत्र परिसरात दिसून येत आहे.

   1 नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात ऊसतोडणी हंगाम जोरात सुरू आहे.ऊसतोडणी झालेल्या रिकाम्या शेतात गव्हाचे पीक घेण्याला शेतकरी पसंती देत आहेत. आगामी काळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास धाण्याचा प्रश्न सोडवता येईल अशी त्यांना आशा आहे.

     ऊस तोडणी झालेल्या शेताबरोबरच उजनी गाळपेर जमिनीही उजनी जलाशयाचा पाणीसाठा कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनी रिकाम्या झालेल्या आहेत या ठिकाणी गहू पेरणीची लगबग सुरू आहे.

  उजनी गाळपेर जमीनीवर पिकांना खताची गरज लागत नाही त्यामुळे कमी खर्च आणि उत्पन्न जास्त मिळते तसेच गव्हाचे पीक घेतल्यानंतर कांदा किंवा उडीद पिक घेण्याचा शेतकऱ्यांना माणस आहे. यावर्षी गाळपेर जमिनीतून दोन पिके घेण्यासाठी सुरुवातीला गहू पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे.

  ” शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे गव्हाची पेरणी करण्याला पसंती दिली जात आहे. ट्रॅक्टर चालकाला एक एकर गहू पेरणी करण्यासाठी 1600 द्यावे लागत आहेत.उजनी जलाशयामध्ये यावर्षी कमी पाणीसाठा असल्याने गाळपेर जमिनीतून दोन पिके घेतली जाणार आहेत.

  -हरि खाटमोडे,शेतकरी,केत्तूर

litsbros

Comment here