खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खते व बियाण्यावर लक्ष ठेवण्याची गरज

खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खते व बियाण्यावर लक्ष ठेवण्याची गरज

केत्तूर ( अभय माने) खरीप हंगामात बोगस बियाणे तसेच खतांची चढ्या दराने खुलेआम विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कृषी खात्याने सतर्क राहण्याची गरज आहे.

अगोदरच दुष्काळी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे तर बागायती पट्टाही पाण्यासाठी कासावीस झाला आहे. त्यामुळे कृषी खात्याने बियाणे मोफत शेतकऱ्यांना वाटप करावे तसेच खतेही बांधावर उपलब्ध करून द्यावीत.

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

बोगस बियाणे व खते विकताना आढळल्यास 9 सप्टेंबर 1972 नुसार फक्त पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद आहे. यामध्येही बदल करून दंडाची रक्कम वाढवावी व शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित विघ्ने यांनी केली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line