वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.
अक्कलकोट देवस्थानचे स्वामीसेवेसह आरोग्य व शिक्षण विषयक कार्य इतरांना अनुकरणीय. – प्रा. गणेश करे पाटील.
केत्तूर (प्रतिनिधी) अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद असुन इतरांना अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन प्रा.करे पाटील यांनी पुरस्कार प्रदान सोहोळ्याप्रसंगी केले.नुकताच करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे मा.महेश इंगळे यांचा समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या समारंभ प्रसंगी प्रा.करे पाटील बोलत होते.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळ्याचे माजी सभापती प्रा.भारतराव शिंदे, नि.पोलीस उपअधिक्षक गोडगे, प्रा. गणेश करे-पाटील, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असो. अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा. शिवशरण अचलेर , पत्रकार,श्रीशैल गवंडी, कृषी पत्रकार गजेन्द्र पोळ, प्रयोगशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे, जीवन शिक्षण फौंडेशनचे प्रमुख प्रा. जयेश पवार, प्रा भिष्मा चांदणे, प्रा.विष्णू शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुखदेव गिलबीले, जलसंपदा अभियंता अतुल दाभाडे, सहसचिव मारूती जाधव, करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असो.अध्यक्ष, पक्षीनिरिक्षक कल्याणराव साळुंके, प्रा. विठ्ठल रोडगे, निवृत्ती बांडे, भिवा वाघमोडे, सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार बिभिषण कन्हेरे, पंचायत समितीचे समन्वयक रेवन्नाथ आदलिंग लोक विकास प्रोड्युसर कंपनीचे संचालक व केळी निर्यादार विष्णू पोळ, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनिल पवार, चंद्रकांत सोनटक्के, स्वामीनाथ मुसळे तसेच करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा केत्तूर येथील नेताजी प्रशालेत निषेध
याप्रसंगी सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असो. अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, कृषी पत्रकार गजेंद्र पोळ यांच्या कार्याची दखल घेऊन देवस्थानचे वतीने महेश इंगळे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
आपल्या मनोगतात प्रा.करे- पाटील पुढे म्हणाले की स्वामी समर्थ देवस्थानमार्फत विविध पातळीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य सुरू आहे. तसेच देवस्थानचे वतीने स्वामी भक्तांना सर्वोत्तम सुविधा मिळवून देण्यासाठीचे सेवाकार्यही व्यापक प्रमाणावर प्रगतीपथावर असून ते अतुलनीय आहे असे मत त्यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी केले तर आभार प्रा.मारूती जाधव यांनी मानले.