महाराष्ट्रात अनलॉक ला सुरुवात; पहा कोणत्या टप्प्यात कोणते जिल्हे होणार अनलॉक? सोलापूर कधी.?
मुंबई, 05 जून: महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल.
पहिला स्तर –
- अहमदनगर
- चंद्रपूर
- धुळे
- गोंदिया
- जळगाव
- जालना
- लातूर
- नागपूर
- नांदेड
- यवतमाळ
दुसरा स्तर –
- हिंगोली
- नंदुरबार
तिसरा स्तर –
- मुंबई
- ठाणे
- नाशिक
- औरंगाबाद
- अकोला
- अमरावती
- बीड
- भंडारा
- गडचिरोली
- उस्मानाबाद
- पालघर
- परभणी
- सोलापूर
- वर्धा
- वाशिम
चौथा स्तर –
- पुणे
- बुलडाणा
- कोल्हापूर
- रायगड
- रत्नागिरी
- सांगली
- सातारा
- सिंधुदुर्ग
वरील दिलेल्या यादीनुसार, त्या त्या स्तरावर जिल्हे अनलॉक केले जातील. या आदेशानुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसंच दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
हेही वाचा- खासगी रुग्णालयांना राज्य सरकारचा दणका; म्युकरमायकोसिस उपचाराचे दर निश्चित
Comment here