अतिवृष्टीनंतर करमाळा शहराची दुरावस्था; गटारी तुंबल्या, सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्य
करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात गेली चार दिवसापासून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले असून, शहरातील अनेक गटारी तुडुंब भरलेले आहेत. परिणामतः ढासाचे साम्राज्य वाढले असून डेंगू सदृश्य रुग्णाची अनेक खाजगी दवाखान्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भरती होत आहे.
शहरात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे गटारीत पाणी बसत नसून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा येतो.
त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देऊन फवारणी करावी अशी मागणी नगरसेविका राजश्री माने यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
करमाळा शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. करमाळा शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी गटारीत न बसल्याने रस्त्यावरून वाहिले आहे. त्यात कचरा अडकतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे नगरपालिकेने याकडे गांभीर्याने पहावे. डासांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित धुराडी मशीनद्वारे फवारणी करून घ्यावी, अशी मागणी नगरसेविका माने यांनी केली आहे.
Comment here