आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालकांनी श्री. आदिनाथ व कोटलिंग चरणी ‘ही’ शपथ घ्यावी; जगताप यांनी केले आवाहन, निवडणूकीत आ.शिंदे सोबतच..
करमाळा (प्रतिनिधी) ; श्री.आदिनाथ सह . साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, बचाव समिती व कारखाना सुरु करणेसाठी पुढाकार घेतलेल्या नेत्यांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा संपूर्ण ऊस फक्त आदिनाथ लाच घालावा, ऊसाचे एक टिपरू देखील दुसऱ्या कारखान्याला घालू नये तशा प्रकारे या सर्वांनी श्री.आदिनाथ व कोटलिंग चरणी शपथच घ्यावी असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चिखलठाण येथे जाहीर सभेत बोलताना केले.
श्री . जगताप आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित होते.
सध्याच्या स्थितीत आदिनाथ सुरु करण्याच्या हालचाली , सातत्याने १५ वर्षे सत्ता असूनही गैरकामकाजामुळे, गैरव्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे सलग ३ वर्षे बंद असलेला कारखाना यामुळे सत्ताधार्यांनी सभासदांचा गमाविलेला विश्वास, त्यांचे मनात असलेला प्रचंड रोष व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार जगताप यांचे विधान अत्यंत महत्वपुर्ण आहे.
यावेळी माजी आ. जगताप यांनी घोडे मैदान जवळच आहे याची आठवण करून देत एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंग फुंकत जनतेला योग्य नेत्यांची प्रतवारी करण्याचे खुले आवाहन केले .
हेही वाचा – करमाळा तालुक्यातील पोथरे येथील शेतकऱ्याचे डेंगूने निधन; तालुक्यात खळबळ
माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..
येणाऱ्या सर्व निवडणुका आपण व आ.संजयमामा शिंदे एकत्रच लढविणार असून योग्य उमेदवार देणार असल्याचे देखील जगताप यांनी सांगितले .
या प्रसंगी आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, उद्धवदादा माळी, तानाजी झोळ, महादेव कामटे, दादासाहेब लबडे, श्रेणिक खाटेर , सुजित बागल यांचेसह चिखलठाण व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Comment here