दिलासादायक बातमी; भारत सरकार म्हणते ‘या’ वयाच्या बालकांना मास्क लावायची गरज नाही; गाईडलाईन्स जारी
मुंबई; केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन अजिबात देऊ नये, तसेच ५ वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये याव्यतिरिक्त सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांच्या आसपास असू शकते.
दरम्यान, याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे. जर ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना ४-६ तासांचे अंतर ठेवावे.
हेही वाचा- साडे येथे किरकोळ वादातून एकाचा खून; आरोपीला अटक
खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा आणि महत्वाचे म्हणजे विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना ६ मिनिट वॉक टेस्ट करा.असेहि मंत्रालयाने आपल्या गाईडलाईन्समध्ये सांगितले आहे.
Comment here